Posts

स्वप्ने आणि परमात्मा

Image
महापुरुषांनी ह्या जगास स्वप्नवत दर्शविले आहे. परंतु ते खरेच स्वप्नवत आहे का? स्वप्नात आपण एक साक्ष म्हणून वावरतो. स्वप्नातील घटनांचा व त्यातील आपल्या अस्तित्वाचा विचार केला असता त्या केवळ स्वप्नापुरता मर्यादित असतात. बरे स्वप्न ह्या त्या स्थितीपुरता मर्यादित मानले तर त्या स्थितीत मर्यादित काळापुरता घडणाऱ्या घटना तितक्याच वास्तविक असतात.  स्वप्नाचा उद्गम ही आपल्यातूनच होतो, त्याचे संचालनही आपले मन करते आणि त्याचा लय आपण जागृत झाल्यावर होतो. ती स्वप्नस्थिती आपल्यात निर्माण होते म्हणून स्वप्नातील सृष्टी, त्यातील माणसे व इतर प्राणी, त्यातील निर्जीव वस्तू ह्या सर्व आपणच असतो. तसेच ह्या जागृत जगताचे आहे. जो ह्या जागृत जगताचा सृष्टीकर्ता आहे, तोच चराचरात व्यापून राहिला आहे. तोच अखंड परमात्मा सत्य असेल तर हे जग ही तेवढेच सत्य आहे. म्हणून आपण खरे आहोत व स्वप्नातील त्या स्थिती ह्या खऱ्या आहेत.  आता ह्या सृष्टीत ठायीठायी परमात्मा असेल तर आपणही त्याचेच स्वरूप आहोत असे समजणे म्हणजे आपण त्या परमात्म्याशी एकरुप होणे होय. इथे प्रत्येक वस्तू आपलेच स्वरूप आहे हेही ह्याद्वारे आपल्या ...

भावविश्व

Image
L एखादा विचार मनात यावा आणि दुसऱ्याक्षणी तो निघून जावा, तसच आपण एका क्षणी स्वप्नात प्रवेश करतो आणि दुसऱ्याक्षणी त्यातून बाहेर येतो. स्वप्नात घडणाऱ्या घटनांना सुरूवात नसते. जेव्हा आपण स्वप्नात प्रवेश करतो तेव्हा एखादा प्रसंग चालु असतो आणि आपण काही क्षण तिथे घालवतो. जणू काही आपली उपस्थिती तिथे क्रमप्राप्त असते. पुढे काय घडणार याची उत्सुकता निर्माण होते न होते तोवर आपण स्वप्नातून बाहेर येतो.  एकंदरित स्वप्नातील हा घटनांचा खेळ निरंतर चालु असतो. जेव्हा आपल्या उपस्थितीची त्यात आवश्यकता असते, तेव्हा आपण स्वप्नात आपसूकच हजर होतो. पण स्वप्नातील आपली उपस्थिती ही आपल्या ताब्यात नसते आणि त्यातील घडणाऱ्या गोष्टींवरही आपला ताबा नसतो. तिथे आपण केवळ आणि केवळ एक प्रेक्षक असतो. स्वप्ने आणि स्वप्नातील गोष्टींची एक वेगळी इच्छाशक्ती असते. ती शक्ती तिच्या मायेने आपल्याला घडणाऱ्या गोष्टींची साक्षी बनवत असते.  जागृत जगात आपला बराचसा ताबा असतो. बऱ्याच गोष्टी आपण ठरवून करतो तर काही गोष्टी नकळत घडतात. पण त्या गोष्टींचा प्रतिसाद आपल्याला हवा तसा मिळेलच याची शाश्वती देता येत नाही आणि काही गोष्...

स्वप्ने आणि वास्तविकता

Image
आपण स्वप्नांकडे कसे पाहतो ह्यावर ती कारण किंवा अकारण आहेत हे आपल्याला समजते. वास्तविकपणे पाहता स्वप्न ही काही क्षणांची असतात. त्यामूळे त्यांचें महत्त्व ही आपल्याला एवढे वाटत नाही. मग स्वप्ने खरंच इतकी विचारात न घेण्यासारखी आहेत? हे जग, ही वास्तविकता जी आपण आता अनुभवतो आहे ती एका काळात घटत असणारी गोष्ट आहे. एकदा गेलेला काळ पुन्हा येत नाही. त्यामूळे प्रत्येक क्षण अद्वितीय असतो. वेळ हा एक धागा आहे आणि वस्त्र म्हणजे क्षण. तो क्षण घडवून आणण्यासाठी काळ कितीतरी गोष्टी विणत असेल.  स्वप्ने ही देखील क्षण आहेत. ती आपण पाहतो, ती त्यावेळी अनुभवतो, त्यात आपण काहीं काळ राहतो, म्हणजे ती देखील ह्या विशाल काळाचा भाग आहेत. आता हा आपला वैयक्तिक भाग झाला की आपण किती क्षणांना महत्त्व देतो आणि किती क्षणांना नाही महत्त्व देत. पण त्यामूळे त्या क्षणांचे उद्देश असफल होत नाही. कारण ते क्षण काहीं कारणांसाठी घडत असतात.  आपण पक्षी नाही पण स्वप्नांत आपण स्वतःला हवेत उंच तरंगताना पाहता. आपण एखाद्या व्यक्तीला स्वप्नांत सहज भेटतो जिची भेट आपल्याला जागृत जगात कठिण वाटते.  स्वप्ने आपल्याला अश्या ...

स्वप्नावस्थेतील गोष्ट

Image
बहुतेक गोष्टींना प्रारंभ आणि शेवट असतो. पण स्वप्नावस्थेतील गोष्टी वेगळ्या असतात. ह्या अवस्थेतील गोष्टींची ना सुरुवात माहित असते ना त्यांचा शेवट माहीत असतो. ह्या गोष्टी अधांतरी राहतात. जर गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठाऊक नसेल तर गोष्ट समजणार तरी कशी? निव्वळ अंदाज बांधून जर ती गोष्ट रचली तरी गेली तरी त्या गोष्टीचा उद्देश त्याच्या प्रारंभाशी निगडित असेलच. आता हेच पाहा, ह्या विश्वाचा प्रारंभ कित्येक वैज्ञानिक व इतर बुद्धिजीवी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. तसेच ह्या विश्वाच्या प्रारंभाचे वेगवेगळे अंदाज बांधून त्यावर सखोल विश्लेषण ही केले जात आहे.  प्रत्येक क्रियेला कारण आहे. तसे स्वप्नांतील गोष्टींना काहीना काही कारण असेलच. दिवसभरात आपण निरनिराळे विचार करीत असतो. त्याचा आपल्या मनात संचय होतो. आपण जरी त्यांचे फार वेळ मंथन करीत बसलो नाही तरी ते विचार मनाच्या कोणत्यातरी कानोस्यात राहतातच आणि रात्री झोपल्यावर आपण मनातील साचलेल्या विचारांच्या अमर्यादित विश्वात प्रवेश करत असतो. तांदळातून खड्यांची जशी निवड करावी तशी स्वप्नेदेखील एखाद्या ठराविक विचाराची निवड करून आपल्याला त्यावर आधारित...